मतदारसंघाच्या विकासाऐवजी आमदारांनी दगडखाणी टाकून स्वतःचाच विकास केला, रवींद्र पाटील यांचे कारनामे उघड

मतदारसंघाच्या विकासाऐवजी आमदारांनी दगडखाणी टाकून स्वतःचाच विकास केला, रवींद्र पाटील यांचे कारनामे उघड

पेण सुधागड मतदारसंघात रोजगार, पाणी, रस्ते असे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. भाजपचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांनी मतदारसंघाचा विकास करण्याऐवजी पाच पाच दगड खाणी टाकून स्वतःचाच विकास केला. रवी पाटील यांचे सर्व कारनामे महाविकास आघाडीच्या पेण येथील सभेत उघड करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद भोईर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

नितीन बानुगडे पाटील यांनी विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या कारभाराची चिरफाड केली. ते म्हणाले, पेणचे उपजिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटर आहे. लोकांना आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र रवींद्र पाटील यांनी विकासाच्या नावाने स्मशानभूमीवर खर्च केला. आरोग्य सुविधा व इतर सुविधा देऊन माणसे जगवायला पाहिजेत. परंतु भाजप आमदार त्यांच्या मरणाची सोय करीत आहेत अशी टीकाही त्यांनी केली. भाजपचे आमदार अपयशी ठरले आहेत त्यामुळे नागरिकांनी प्रसाद भोईरसारखा उच्चशिक्षित, दूरदृष्टी असलेला, प्रशासनाची माहिती असलेला तरुण उमेदवार विधानसभेत निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, शेकापचे महादेव दिवेकर, सुभाष म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, दीपश्री पोटफोडे, स्मिता पाटील, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष महेश पोरे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, दिनेश चिले, समीर शेडगे, विधानसभा सहसमन्वयक समीर म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख भगवान पाटील, लहू पाटील, शहरप्रमुख सुहास पाटील, माजी शहरप्रमुख प्रदीप वर्तक, राजेंद्र राऊत, योगेश पाटील, रोहिदास म्हात्रे, विभागप्रमुख राजू पाटील, नरेश सोनवणे, वसंत म्हात्रे, दर्शना जवके, महानंदा तांडेल, राजश्री घरत, अच्युत पाटील, दिलीप पाटील, नंदू मोकल, चेतन मोकल, राजाराम पाटील, रवींद्र पाटील, गजानन मोकल, चंद्राहास म्हात्रे आदी उपस्थित होते.

42 गावांना फिल्टरचे पाणी

शिवसेनेने आंदोलन केल्यामुळेच जेएसडब्ल्यू कंपनी 42 गावांना पाणीपुरवठा करते. कंपनीला वठणीवर आणून या 42 गावांना फिल्टरचे पाणी द्यायला भाग पाडू, असा इशारा जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील यांनी दिला तर महायुतीचे नेते स्वार्थापोटी एकत्र आले आहेत. कार्यकर्त्यांचे बिघडलेले संबंध व तुटलेली घरे यांना दिसत नाहीत. याचमुळे मतदार महायुतीला नाकारतील, असा विश्वास जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;