चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे हे अतर्क्य, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ सिंघवी यांचे मत

चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे हे अतर्क्य, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ सिंघवी यांचे मत

हिंदुस्थानचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे संयमी होते, कामाचा ताण ते उत्तमरित्या सांभाळत होते. पण त्याच्यांच काळात संत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडला हे विसंगत आहे असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केले आहे. तसेच लवकर निकाल लागावा म्हणून चंद्रचूड यांच्याकडे अनेकदा विनंतीही केली पण त्यांच्या काळात निकाल लागलाच नाही असेही सिघवी म्हणाले.

लोकसत्ता या दैनिकाला अभिषेक मनू सिंघवी यांनी मुलाखात दिली. त्यावेळी सिंघवी म्हणाले की, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे विद्वान होते, संयमी होते. इतकंच नाही तर ते उत्तमरित्या कामाचा ताण सांभाळत होते. पण त्यांच्याच कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लागला नाही असेह सिंघवी म्हणाले.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. त्याची बाजू आपण सर्वोच्च न्यायालयात मांडली. धनंजय चंद्रचूड यांची सरन्यायाधीश म्हणून कारकीर्द 90 टक्के चांगली होती. पण त्यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल न देण्याची कार्यपद्धती अतर्क्य होती असे सिंघवी म्हणाले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरात लवकर निकाल लागावा अशी विनंती त्यांनी आम्ही वारंवार केली. तरी अखेरपर्यंत निकाल लागलाच नाही. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपणार आहे. असे असले तरी या याचिका निष्फळ ठरणार नाही.

राज्यघटनेतले दहावे परिशिष्टाचा अर्थ, फुटलेल्या आमदारांचे कृत्य, विधानसभा आणि राज्यपालांनी निभावलेली भुमिका तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल हे महत्त्वाचे ठरेल. कारण याच निर्णयांवरून भविष्यकाळातील राजकीय घटनांसाठी मार्गदर्शक ठरतील असेही सिंघवी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;