“टॉक्सिक लोकांना आयुष्यातून..”; अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाचा कोणाला टोमणा?

“टॉक्सिक लोकांना आयुष्यातून..”; अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाचा कोणाला टोमणा?

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. वयातील अंतराला न जुमानता हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र त्यांचं हे नातं आता संपुष्टात आलं आहे. ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अर्जुनने सिंगल असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता मलायकाची एक पोस्ट चर्चेत आली आहे. अर्जुनसोबत ब्रेकअप केल्यानंतर मलायका तिच्या लाइफस्टाइलकडे अधिकाधिक लक्ष देत असल्याचं या पोस्टवरून समजतंय. नोव्हेंबर महिन्यात ती कोणकोणत्या गोष्टींवर अधिक भर देणार आहे, याची यादीच मलायकाने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे. या यादीतल्या सर्वांत शेवटच्या गोष्टीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय.

याआधी मलायकाने नोव्हेंबर महिना सुरू होताच ”नो’व्हेंबर.. तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या लोकांना, ठिकाणांना आणि गोष्टींना नाही म्हणण्याची वेळ आली आहे,’ अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. आता तिने नोव्हेंबर महिन्यातील ‘चॅलेंज’ची यादी टाकली आहे. ‘1- मद्यापन नाही, 2- आठ तासांची झोप, 3- मार्गदर्शक निवडणे, 4- प्रत्येक दिवशी व्यायाम करणे, 5- एका दिवसात 10 हजार पावलं चालणे, 6- सकाळी 10 वाजेपर्यंत रोज उपवास करणे, 7- प्रोसेस्ड अन्नपदार्थ खाणं टाळणे, 8- रात्री 8 वाजल्यानंतर काहीच न खाणं, 9- टॉक्सिक लोकांना आयुष्यातून काढून टाकणं’, अशा सर्व गोष्टी या यादीत लिहिलेल्या आहेत.

मलायकाची पोस्ट-

मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्रेकअपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा अर्जुन आणि मलायका हे सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे पोस्ट लिहित होते. मात्र दिवाळीत पहिल्यांदाच अर्जुनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. अर्जुन मुंबईतील एका दिवाळी पार्टीत पोहोचला होता. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी पार्टीत तो ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगण, टायगर श्रॉफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांसारख्या कलाकारांसोबत पोहोचला होता. यावेळी गर्दीतून चाहत्यांनी जेव्हा मलायकाचं नाव घेतलं, तेव्हा अर्जुनने ‘मी सिंगल आहे’ असं स्पष्ट केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;