“..तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं”, ऐश्वर्या राय असं का म्हणाली?

“..तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं”, ऐश्वर्या राय असं का म्हणाली?

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आजवरच्या तिच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. तिच्या करिअरमध्ये आणखी एका जबरदस्त भूमिकेचा समावेश झाला असता, मात्र त्या भूमिकेला तिने नकार दिला होता. मॉडेलिंगच्या दिवसांत जे केलं, तीच गोष्ट पुन्हा करत असल्याचा ठपका लागेल या भीतीने तिने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला नकार दिला होता. हे फार क्वचित लोकांना माहीत असेल की करणने त्याच्या ‘कुछ कुछ होता है’मधील भूमिकेसाठी सर्वांत आधी ऐश्वर्याला विचारलं होतं. नंतर ती भूमिका राणी मुखर्जीने साकारली. या चित्रपटासाठी करणने शाहरुख खान आणि काजोल यांना निश्चित केलं होतं. मात्र तिसऱ्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधणं त्याच्यासाठी खूप अवघड होतं.

“मी प्रत्येकाला त्या भूमिकेसाठी विचारलं होतं. मी त्या चित्रपटासाठी अक्षरश: भिकारी बनलो होतो. राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी आठ अभिनेत्रींनी आधीच नकार दिला होता. मला वाटलं होतं जर कोणीच होकार नाही दिला तर मलाच शॉर्ट स्कर्ट घालून ती भूमिका साकारावी लागेल. कथा ऐकल्यानंतर ऐश्वर्या रायशिवाय कोणीही मला परत फोन केला नाही”, असा खुलासा करणने एका कार्यक्रमात केला होता.

1999 मध्ये ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्यानेही भूमिका नाकारण्याविषयीचा खुलासा केला होता. ती म्हणाली, “कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी करणने मला विचारलं होतं. पण माझ्या तारखा आरके बॅनरअंतर्गत बनणाऱ्या चित्रपटासाठी ठरलेल्या होत्या. त्याहीपेक्षा कुछ कुछ होता है हा चित्रपट काजोलविषयी अधिक आहे. यात काहीच दुमत नाही आणि राणी मुखर्जीनेही खूप चांगलं काम केलंय. जर मी हा चित्रपट केला असता तर लोक म्हणाले असते, पहा ऐश्वर्याने तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांत जे केलं, तेच ती पुन्हा करतेय. तिचे केस एकदम सरळ आहेत, मिनी स्कर्ट्स घातलाय आणि कॅमेरासमोर अत्यंत ग्लॅमरस लूक दिसतोय. मला माहितीये, जर मी कुछ कुछ होता है हा चित्रपट केला असता तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं.”

‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आजही अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी या तिघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;