विकास आराखड्यात नागरिकांच्या मागण्यांचाही विचार करावा!

विकास आराखड्यात नागरिकांच्या मागण्यांचाही विचार करावा!

केवळ टोलेजंग इमारती किंवा भव्य रस्ते म्हणजेच विकास नव्हे तर नागरिकांना गुणवत्तापूर्ण मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असते. केवळ विकास आराखडा तयार करून विकास नियोजन अभियंत्यांची जबाबदारी संपत नाही तर त्याची अंमलबजावणी होऊन शहराला राहण्यायोग्य बनवणे हीसुद्धा त्यांची जबाबदारी आहे. विकास आराखडा बनवताना सुविधांच्या उपलब्धतेसोबतच नागरिकांच्या मागण्यांचाही विचार करावा, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या.

विकास नियोजन विभागाच्या कामकाजाचा आयुक्तांनी पालिका मुख्यालयात आज आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला विकास नियोजन विभागाचे कामकाज, विकास आराखडा, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उपलब्ध जागा आणि त्यावरील आरक्षण, विकास आरखडा विभागाच्या गरजा आणि अडचणी आदींबाबत सादरीकरण करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;