महाराष्ट्राच्या राजकीय तुळशी वृंदावनामध्ये फडणवीसांना भांगेची रोपटी लावली; संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्राच्या राजकीय तुळशी वृंदावनामध्ये फडणवीसांना भांगेची रोपटी लावली; संजय राऊत यांचा घणाघात

रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून महायुतीतील नेत्यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय तुळशी वृंदावनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भांगेची रोपटी लावली, असा घणाघात राऊत यांनी केला.

गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींनी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. सदाभाऊ खोत यांच्या बापाने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बारामतीत जाऊन शरद पवार कसे आपले राजकीय गुरू आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा देश कसा घेतोय हे वारंवार सांगितले. किंबहुना पवारांचे बोट पकडून आम्ही कसे राजकारण केले हे मोदींनी सांगितले.

भाजप सरकारने भारतरत्न नंतरचा देशातील सर्वोच्च नागरी किताब पद्मविभूषण शरद पवारांना दिला. त्यांच्या राजकीय, सामाजिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दल हा किताब त्यांना देण्यात आला. पवारांनी काहीच केले नाही असे हे जे टमरेल म्हणतात त्यांनी त्यांच्या गेल्या 60-70 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा पाहिला पाहिजे आणि आपण या राज्यासाठी नक्की काय योगदान दिले याचे आत्मचिंतन केले पाहिजे, असा टोला राऊत यांनी सदाभाऊ यांना लगावला.

पवारांसारखा नेते राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणातला भीष्मपितामह आहे. सदाभाऊ खोत यांनी पवारांच्या आजारपणावर अशा प्रकारचे वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमणे खाली घातलेली आहे. फडणवीस यांनी या लायकीची माणसं महाराष्ट्रात उभी केली आहेत. या राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अशा सगळ्या महान राजकारण्यांची परंपरा आहे. त्या तुळशीच्या वृंदावनांमध्ये भांगेची रोपटी देवेंद्र फडणवीस लावलेली आहे. महाराष्ट्रात विष पेरण्याचे काम सुरू आहे. कधी पडळकर, तर कधी खोत, तुमचे मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी योगदान काय? असा सवाल राऊत यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

लोकशाहीत टीका करायला हरकत नाही, पण हे कोणत्या नशेत असतात. सदाभाऊ खोत यांचे भाषण ऐकले तर किळस येईल. देवेंद्र फडणवीस फिदीफिदी हसत होते, टाळ्या वाजवत होते. महाराष्ट्र त्यांचा तिरस्कार करतो, तो यासाठीच. देवेंद्र फडणवीस यांनी उठून सदाभाऊ खोत यांच्या कानफडात मारायला पाहिजे होती. आम्हाला लाज वाटते की कधीकाळी तुम्ही आमच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री होतात, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. तसेच हे राज्य सुसंस्कृत, संयमी, संतांचे आणि चांगल्या राजकारण्याचे आहे. फडणवीस आणि त्यांच्या टोळीने हे राज्य खतम केले, म्हणून आम्हाला राज्यातील सत्ता बदलायची आहे, असेही राऊत म्हणाले.

शरद पवारांबाबत बोलताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत शहरी नक्षलवादी चालत होते असे भाष्य करणाऱ्या फडणवीस यांचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. शहरी नक्षलवाद ही संकल्पना भाजपने आणली. भारत जोडो यात्रेत आम्हीही सहभागी झालेलो. आम्ही शहरी नक्षलवादी आहेत का? या यात्रेत अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते, सामान्य नागरीक, माजी सैनिक, सैन्य अधिकारी, आयएएस, पोलीसही सहभागी झालेले. आता तुमच्याबरोबर इकबाल मिर्चीचे सहकारी दाऊद समर्पित राजकारणी आलेले आहेत ते कोण आहेत? आपण जरा आपल्या अवती भवती कोण बसलेत आंडूपांडू त्यांच्यावर बोला. डोळे तपासून घ्या, चष्मा लावा, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीस यांना दिला.

महाविकास आघाडीची गॅरंटी… महाराष्ट्राच्या विकासाची पंचसूत्री

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;