रश्मी शुक्ला यांना का हटवत नाही? काँग्रेसचे पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र

रश्मी शुक्ला यांना का हटवत नाही? काँग्रेसचे पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र

पश्चिम बंगाल व झारखंडच्या पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी भाजपने करताच त्यांना तत्काळ बदलण्यात आले, पण वादग्रस्त रश्मी शुक्ला यांना अद्याप या पदावरून हटवण्यात आले नाही? झारखंड-पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का, असा सवाल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केला आहे.

वादग्रस्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र पाठवले आहे. यापूर्वी काँग्रेसने 24 सप्टेंबर व 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. 27 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱयावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती, पण या मागणीकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा पत्र पाठवले आहे.

पत्रात काय म्हटले आहे

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे व त्यांना नाहक त्रास देण्याचे फर्मान पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधिकाऱयांना सोडले आहे. पोलीस यंत्रणा विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अडवणूक करत आहेत, त्यांच्यावर दबाव आणत आहेत, धमक्या देत आहेत. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती याआधीही वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे पह्न टॅपिंग केले होते, शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत.

राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना पोलीस महासंचालकपदावर नियुक्त करण्यात आले आणि निवृत्तीनंतरही त्यांना नियमबाह्य पद्धतीने कार्यकाल वाढवून दिला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून तत्काळ हटवावे, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्रात केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;