अटकेपासून वाचण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले, जयंत पाटील यांचा दावा

अटकेपासून वाचण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले, जयंत पाटील यांचा दावा

अटकेपासून वाचण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच भाजपने ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले ते नेते भाजपसोबत गेले असेही जयंत पाटील म्हणाले.

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले. भाजपने अनेक नेत्यांवर आरोप केले ते भाजपसोबत गेले. हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपने आरोप केले होते आता ते महायुतीमध्ये मंत्री आहेत. नवाब मलिक यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते पण ते आता अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. भाजपचे जे मतदार आहेत ते सुद्धा गोंधळलेले आहेत. भाजपने स्वतःला वेगळा पक्ष म्हटलं होतं, पार्टी विथ डिफरन्स म्हटले होते पण आता त्यांचा पाठीराखा वर्गही संभ्रमात आहे असे जयंत पाटील म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;