हतबल ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणूनही काम करावे; वांद्रे चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरे यांचा संताप

हतबल ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणूनही काम करावे; वांद्रे चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरे यांचा संताप

वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस पकडताना वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सुमारे 28 रेल्वे अपघात झाले आहेत. असे असतानाही रेल्वेमंत्री काय करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संतपा व्यक्त केला आहे. या घटनेतून रेल्वेमंत्री हतबल असल्याचे दिसून येत आहे, या रीलमंत्र्यांनी आता कधीतरी रेल्वेमंत्री म्हणून काम करावे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला.

सोशल मिडियावर एक्सवर पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं. सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, परंतु दर आठवड्याला दर आठवड्याला काही ना काही घटना रेल्वे दुर्घटना आणि अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं, हे लज्जास्पद आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. यात 9 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची फलाटवार गर्दी झाली होती. याच गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;