‘राजा राणी’वर बंदीची मागणी करणाऱ्या वकिलांनी अखेर सूरज चव्हाणची मागितली माफी

‘राजा राणी’वर बंदीची मागणी करणाऱ्या वकिलांनी अखेर सूरज चव्हाणची मागितली माफी

‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणचा ‘राजा राणी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘राजा राणी’ हा चित्रपट समाजासाठी घातक असून या चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे, असा आरोप वकील वाजिद खान (बिडकर) यांनी केला होता. इतकंच नव्हे तर सूरजच्या या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठावून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर सूरजने प्रेक्षकांसमोर आवाहन केलं होतं. त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘आय सपोर्ट सूरज चव्हाण’ या हॅशटॅगने त्याच्या समर्थनार्थ मोहीमच चालवली होती. ‘राजा राणी’च्या निर्मात्यांनी वकिलांना चित्रपट पूर्ण पाहा आणि त्यानंतर आपलं मत कळवा, अशी विनंती केली होती. त्यानंतर वकिलांनीही चित्रपट पाहिल्यानंतर निर्मात्यांना फोन करून आपण चर्चा करून पत्रकार परिषद घेऊ असं म्हटलं होतं. आता सूरजच्या चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्या वकिलांनीच त्याची माफी मागितली आहे.

चित्रपटाला विरोध करणारे वकील वाजिद खान, ‘राजा राणी’ चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दौलताडे, दिग्दर्शक शिवाजी दौलताडे, अभिनेता रोहन पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत वकील वाजिद खान यांनी सूरज चव्हाण आणि त्याच्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमची जाहीर माफी मागितली. “माझ्याकडून चित्रपटाबाबत गैरसमज झाला. पूर्ण माहिती न घेता आम्ही हे वक्तव्य केलं. यामुळे ज्यांची मनं दुखावली असतील त्यांची मी माफी मागतो”, असं वाजिद खान म्हणाले.

यावेळी चित्रपटाचे निर्माते म्हणाले, “आमचा राजा राजाणी हा चित्रपट खरा आहे आणि शेवटी सत्याचाच विजय झाला.” तर “माझा चित्रपट मुलामुलींमध्ये चांगला संदेश देणारा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतोय”, असं दिग्दर्शक शिवाजी दौलताडे म्हणाले. या चित्रपटावर बंदी आणली असती तर आमच्यावर आत्महत्येची वेळ आली असती, अशी भावना मुख्य अभिनेता रोहन पाटीलने बोलून दाखवली.

चित्रपटाला विरोध का झाला?

“बिग बॉस मराठीनंतर सूरज चव्हाणच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर अनेकजण त्याला फॉलो करतात. पण त्याचा ‘राजा राणी’ हा त्याचा चित्रपट पाहून अनेक तरुण-तरुणी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकतात. याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाच्या शेवटी असं दाखवण्यात आलं आहे की समाज आणि नातेवाईकांमुळे चित्रपटातील दोन प्रेमी एकत्र येऊ शकत नाहीत. म्हणून चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री टोकाचं पाऊल उचलत एकमेकांवर गोळ्या झाडून आत्महत्या करतात. असा चुकीचा संदेश चित्रपटाच्या सरतेशेवटी देण्यात आलेला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे,” असं वाजिद खान यांनी म्हटलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;