सरकारने संधी गमावली… आता युद्ध अटळ! मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

सरकारने संधी गमावली… आता युद्ध अटळ! मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कुठल्या पाडणार याबाबत निर्णय घेऊ. राज्य सरकारला संधी दिली होती. मात्र त्यांनी संधीचं सोनं केलं नाही. त्यामुळे आता युद्ध अटळ असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते.

जरांगे म्हणाले की, निवडणूक लढण्याची माझी इच्छा नव्हती. मात्र समाजाची होती. त्यामुळे मला त्यांचे ऐकावे लागते. आता लढणार, पाडणार आणि जिरवणार आहे. आम्ही कुठलाही पक्ष टार्गेट करत नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला आरक्षण मिळू दिले नाही हे खरे आहे. एकनाथ शिंदे यांना नुकसान होईल की नाही, याबाबत दोन दिवसानंतर विचार करू, असे ते म्हणाले. आम्ही काल सगळ्यांनी अर्ज भरून घ्या असे म्हटले होते. पण सगळ्यांनी भरू नका. दोन ते तीन जणांची निवड करून त्यांनीच अर्ज भरा. ज्या दिवशी एक नाव घोषित होईल तेव्हा बाकीच्यांनी अर्ज मागे घ्या. फक्त एक अर्ज ठेवणार. आपण एसटी, एससी उमेदवार देणार नसून व जिथे उमेदवार उभे करायचे नाहीत, तिथे विचाराशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराने पाचशे रुपयांच्या बाँडवर आमच्या मागण्यांशी सहमत असल्याचे लिहून बॉण्ड घ्यायचा, असं ठरलं होतं’ पण उलटेच घडले. बॉण्ड म्हटले की कोणीही बॉण्ड देउâ लागल्याचे ते म्हणाले.

आम्हाला काही तुम्हाला खर्चात पाडायचे नाही. आम्ही तुमच्या मागण्यांशी सहमत आहोत. हे आधी आमच्याशी संवाद साधा, नंतर बॉण्ड द्या. संवाद साधल्याशिवाय कोणीही बॉण्ड देऊ नये. कारण आम्हाला तिथले समीकरण पाहणे, काम पाहणे आहे. मी काल व्यासपीठाच्या खाली उतरताच तातडीने एका जणाने बॉण्ड दिला. पण तुमचे मेरीट देखील बघावे लागणार आहे. एका मतदारसंघातून पन्नास – शंभर बॉण्ड आले तर उगाच खर्च वाढेल. त्यामुळे बॉण्ड देण्यापूर्वी आम्हाला एकदा विचारा, जिथे आम्ही लढणार नाही, तिथला हा विषय आहे. आंतरवाली सराटीकडे चार दिवस कोणीही येऊ नका, मला मोकळं सोडा, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;