आई शेरडाकडं गेली, ती परत आलीच नाही…; सूरज चव्हाणने सांगितला अंगावर शहारे आणणारा प्रसंग

आई शेरडाकडं गेली, ती परत आलीच नाही…; सूरज चव्हाणने सांगितला अंगावर शहारे आणणारा प्रसंग

‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचा साधेपणा लोकांना भावतो. सूरजला आई- वडील नाहीत. पण जेव्हा केव्हा आई- वडिलांचा विषय निघतो. तेव्हा तेव्हा सूरज चव्हाण भावूक होतो. एका मुलाखतीमध्ये सूरज चव्हाण याने त्याच्या आईबद्दलच्या आठवणी सांगितल्या. वडील गेल्यानंतर आई पूर्णपणे खचल्याचं सूरजने सांगितलं. मी गोट्या खेळायला गेलो होतो. तेव्हा माझे वडील गेले. आमच्या अप्पांना कॅन्सर झाला होता. अचानकपणे त्यांच्या मृत्यू झाला, असं सूरज चव्हाण म्हणाला.

सूरज चव्हाण आईबद्दल काय म्हणाला?

आमचे अप्पा गेल्यानंतर आईने त्याचं खूप टेन्शन घेतलं. त्यामुळे तिला वेड लागलं. तिला काही कळायचं नाही. हायवेला जाऊन उभी राहायची. गाड्या वगैरे आलेल्या तिला कळायच्या नाहीत. तिला भीतीच वाटायची नाही. मला लोकं येऊन म्हणायची की तुझी आई तिकडे आहे. मग मी तिला घेऊन यायचो, असं सूरज चव्हाण याने सांगितलं.

एकदा तर काय झालं ही फॉरेस्ट ( जंगलात) गेली. ती शेरडांना चारायला घेऊन गेली. शेरडा घरी आल्या पण आई आलीच नाही. ती अंधारात तिकडंच बसली. पहाटे मग घरी आली. दरवाजा वाजवला. बहिणीने दरवाजा उघडला. आईला विचारलं कुठं गेली होती म्हणून. पण तिला त्यावेळी काहीच कळत नव्हतं, असं सूरज म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

माझ्याकडून एकदा वरूटा ( पाटा वरवंटा) आईच्या पायावर पडला. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मला वाटलं स्वत: लाच मारून घ्यावं. त्याची सल आजही माझ्या मनात आहे, असं सूरजने या मुलाखतीत सांगितलं. मी माझ्या आई- वडिलांचा लाडका होतो. मी शाळेत जायचो पण मला काही कळायचं नाही. वाचायला पण यायचं नाही. शिक्षकांनी मला शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण मला ते जमलंच नाही. आमचे अप्पा म्हणायचे की माझा पोरगा नाही शिकला तरी चालेल, असं सूरज चव्हाण म्हणाला. हे सगळं सांगताना सूरजचं मन भरून आलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;