दखल- बालमनाचे भावविश्व

दखल- बालमनाचे भावविश्व

 

>> प्रा. डॉ. नरसिंग कदम बनवसकर

बालकविता या बालकांच्या जीवनाभूती मांडत असतात. बालकांच्या जरी कविता असल्या तरी त्या लिहिणे कठीणप्राय प्रांत असतो. कारण कविता लिहिताना अगोदर त्यांच्या बालमनाच्या जाणिवांपर्यंत पोहोचावे लागले. प्रसंगी आपल्यालाच बालक व्हावे लागते, तेव्हाच त्यांच्या अनुभूती साकारता येतात. डॉ. कैलास दौंड यांनी बालकांच्या अनुभूती अतिशय बारकाव्यानिशी ‘आई, मी पुस्तक होईन‘ या बालकवितासंग्रहातून चित्रित केल्या आहेत.

साहित्यविश्वामध्ये अतिशय रुळलेले नाव म्हणजे डॉ. कैलास दौंड हे होय. ग्रामीण जीवनाशी नाळ असलेला हा साहित्यिक वास्तव जीवन रेखाटतो. त्यांचे स्वतचे बालपण खेडय़ामध्ये गेल्यामुळे ग्रामजीवनातील अस्मानी आणि सुलतानी संकटाने त्रस्त झालेले चित्रणाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यामधून अधोरेखीत झाले. जीवनामध्ये प्रत्येकाने असे काही करावे, असे काही व्हावे की आपल्यामुळे इतरांच्या जीवनाला कलाटणी मिळावी. ही कलाटणी पुस्तकातून मिळते. म्हणून ते बालक पुस्तक होऊ इच्छिते. ते म्हणते,

‘आई, मी पुस्तक होईन, हसत खेळत ज्ञान देईल

धरतील जे मैत्री माझी, जगण्याचे मी भान देईल’

ज्याच्या हातामध्ये पुस्तक आले त्याला कसे जगायचे, कसे वागायचे याचे सर्व ज्ञान आणि भान मिळते. त्यामुळे ते पुस्तक बनू इच्छिते. पक्षी मनाला आनंद देतात हे वास्तव कवी रेखाटतात. मोर हा पिसारा फुलवतो, थुईथुई नाचतो. म्हणून तर कवी म्हणतात,

‘आभाळातले इंद्रधनू, त्याच्यासाठी आले जणू!

थेंब पडती ओली भूई, मोर नाचतो थुईथुई !’

सावित्रीबाईने छळ सहन करून शिक्षणाची फळे स्रियांना दिली म्हणूनच आजच्या स्रिया उच्चशिक्षित होत आहेत. त्या सावित्रीचा कृतज्ञतापूर्वक आदर करताना म्हणतात, ‘साऊ शिकली जिद्दीने जोतिबाने शिकवले, देशातल्या लेकींसाठी आभाळ तिने झुकविले’

पुस्तक नवी स्वप्नं, नवी उमेद, नव्या आशा निर्माण करतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकाशाचा किरण होऊन येतात म्हणून ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देणारी दौंड यांची कविता आहे. दौंड यांची कविता संविधानाची जागृती करते, जि. प. शाळेचे महत्त्व, अधोरेखित करते. नदीचा पूर, तळ्याचे पाणी, सणवार, मजूर, नाव, वृक्षारोपण, सकाळ-संध्याकाळ, ऋतू कवी अशा विविध विषयाचे महत्त्व मुलांच्या बोबडय़ा बोलातून सर्व समावेशक कसे आहे त्याची काळजी सर्वांनी घ्यावी हा भाव रुजवते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;