‘फोन पे करा, गुगल पे करा’ पण बाहेरगावी असलेल्या मतदारांना बोलवा; गद्दार आमदार संतोष बांगर यांचे रोख आमिष

‘फोन पे करा, गुगल पे करा’ पण बाहेरगावी असलेल्या मतदारांना बोलवा; गद्दार आमदार संतोष बांगर यांचे रोख आमिष

कळमनुरी मतदारसंघातील बाहेरगावी असलेल्या लोकांची दोन-तीन दिवसात यादी आमच्याकडे आली पाहिजे. आणि ‘त्यांना काय लागते ते सांगा’.. ‘फोन.. पे.. गुगल.. पे..’ करा, पण बाहेरगावी असलेल्या मतदारांना बोलावून घ्या, असे जाहीर आवाहन मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांनी केले.

कळमनुरी शहरातील तोष्णीवाल मंगल कार्यालयात आज शुक्रवारी मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर हे एका जाहीर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना म्हणाले की, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील बाहेरगावी असलेल्यांची यादी दोन-तीन दिवसांत आमच्याकडे आली पाहिजे. त्यांना सांगायचं गाड्या करा तुम्हाला काय लागते ते सांगा… तुम्हाला सांगतो की, त्यांना काय लागते त्या पद्धतीने फोन.. पे.. गुगल..पे.?. करा.. त्यांना काय लागते ते पोहोचले पाहिजे. आता दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीमध्ये बाहेरगावी असलेले लोक आपल्या घरी येतात. दिवाळीमध्ये त्यांना सांगा बापू तुम्हाला येण्या जाण्यासाठी गाडी लागते.. काय लागते ते आम्ही देऊ.. तू आमच्यासाठी यायलास? असे त्यांना विश्वासाने सांगा. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, मतदारसंघातील बाहेरगावी असलेले मतदार हे मोठ्या संख्येने आले पाहिजे. अशा पद्धतीने मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आवाहन केले. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना आमदार संतोष बांगर यांनी एका जाहीर कार्यक्रमात मतदारांना ‘फोन.. पे.. गुगल..पे..’ वर मतदारांना पैसे पाठवा असे जाहीर वक्तव्य केले आहे. आचारसंहितेच्या कालावधीत आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदारांना एक प्रकारे आमिष दाखविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे कोणती कारवाई करणार आहेतयाकडे हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करणार

मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी येथील एका जाहीर कार्यक्रमात बाहेरगावी असलेल्या मतदारांना फोन पे गुगल पे करा त्यांना काय लागते ते द्या. त्यांच्यासाठी गाड्या करा पण त्यांना बोलावून घ्या, असे वक्तव्य केले आहे.? गद्दार आमदार संतोष बांगर यांना येणाऱ्या निवडणुकीत आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे ते मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे काम करीत आहेत. मतदारांना पैशाचे अमिष दाखविल्याच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे लेखी तक्रार देणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंगोली जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;