दूषित पाण्यामुळे कलोते गावातील 25 मुलांना कावीळ

दूषित पाण्यामुळे कलोते गावातील 25 मुलांना कावीळ

पाळीव प्राण्यांच्या मलमूत्रामुळे कलोते मोकाशी धरणातील पाणी दूषित झाले आहे. याच दूषित पाण्याचा पुरवठा होत असलेल्या कलोते गावातील सुमारे 25 मुलांना कावीळची बाधा झाली आहे. त्यामुळे गावातील आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. इतक्या मोठ्या संख्येने मुलांना कावीळ झाली असली तरी आरोग्य यंत्रणेने मात्र कोणतीच हालचाल केलेली नाही. आरोग्य यंत्रणेच्या उदासीन भूमिकेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

कलोते धरणाचे पाणी यापूर्वी शुद्ध होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी धनदांडग्यांनी येथील शेतकऱ्यांच्या जागा घेऊन या ठिकाणी फार्महाऊस बांधले आहेत. या फार्महाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी पाळले जात आहेत. पाळीव प्राण्यांमध्ये प्रामुख्याने उंट, गाय, अनेक जातींचे कुत्रे, घोडा, ससे, मांजर यांचा समावेश आहे. या प्राण्यांच्या मलमूत्रासाठी कोणतीही व्यवस्था फार्महाऊसच्या मालकांनी केलेली नाही. त्यामुळे हे सर्व मलमूत्र धरणाच्या पाण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात मलमूत्र मिसळत असल्याने धरणाचे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. याच पाण्याचा पुरवठा कलोते गावासह परिसराला केला जातो. मोठ्या संख्येने ग्रामस्थ हेच पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र पाणी दूषित झाल्यामुळे कलोते गावातील २५ मुलांना कावीळची बाधा झाली आहे. दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारामुळे अनेक ग्रामस्थही आजारी पडले आहेत. धरणातील पाणी दूषित झाल्याचे उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे,

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

विशेष म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय याच गावात असून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर हाकेच्या अंतरावर खालापूर, चौक ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र आरोग्य खाते बेसावध असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. या परिसरातील स्थानिक कार्यकर्ते यांचे पाठबळ असल्यामुळे कुणालाही न जुमानता राजरोसपणे येथे पाळीव प्राण्यांचा व्यवसाय सुरू आहे. यासंदर्भात येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून शासकीय पातळीवर निवेदन देण्यात आले. मात्र या निवेदनाची कोणतीही दखल शासकीय पातळीवर घेण्यात आलेली नाही

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;