सलमान खान एक अट पूर्ण करताचा 26 वर्ष जुना वाद मिटणार, बिश्नोई समाजाची माफी देण्याची तयारी पण…

सलमान खान एक अट पूर्ण करताचा 26 वर्ष जुना वाद मिटणार, बिश्नोई समाजाची माफी देण्याची तयारी पण…

bishnoi community and salman khan: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नाईचे नाव आले. त्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि काळवीट शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले. सलमान खान आणि बिश्नोई समाजातील वाद मिटण्याची चिन्ह निर्माण झाला आहे. कळवीट शिकर प्रकरणात सलमान खानवर बिश्नोई समाज नाराज आहे. 1998 पासून सुरु असलेला हा जुना वाद मिटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. भारतीय बिश्नोई महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पुढाकर घेतला आहे. त्यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. सलमान खानने माफी मागितली तर बिश्नोई समाज त्याला माफ करेल, असे देवेंद्र बुडिया यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले देवेंद्र बुडिया

स्थानिक माध्यमांशी बोलताना भारतीय बिश्नोई महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी सांगितले की, सलमान खान या ठिकाणी आला पाहिजे. त्याने आपली चूक कबूल करावी आणि माफी मागावी. त्यानंतर बिश्नाई समाजातील ज्येष्ठ मंडळी एकत्र बसतील आणि गुरु जंभेश्वर यांनी सांगितलेल्या 29 नियमांनुसार माफी देण्याचा निर्णय घेऊ शकतात.

काय होतो तो प्रकार

सलमान खान 1998 मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जोधपूरला गेला होता. चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावड गावाजवळ सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. सलमान खान याला तुरुंगात जावे लागले होते. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरु आहे. या घटनेमुळे बिश्नोई समाज सलमान खानवर नाराज आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या आणि त्यापूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले. त्यामुळे हा समाज सलमान खानला माफ करणार की नाही? ती चर्चा आता सुरु झाली आहे. त्यावर देवेंद्र बुडिया यांनी भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र बुडिया यांनी म्हटले की, बिश्नोई समाजचे जे 29 नियम आहेत त्यातील दहावा नियम क्षमा करण्यासंदर्भात आहे. आमचे धर्मगुरु भगवान जंभेश्वर यांनी हे 29 नियम बनवले आहे. त्यानुसार कोणी काही गुन्हा केला, त्यासाठी त्याने क्षमा मागितली, त्याच्या मनात क्षमा भाव असेल तर त्याला माफ करत येते. आमचा समाज कधी कोणाचे नुकसान करणार नाही. जेव्हा कोणी मनात क्षमाची भावना घेऊन येतो तेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोक एकत्र बसून त्याला माफ करण्याचा निर्णय घेतात.

हे ही वाचा…

550 वर्षे जुने नाते… बिष्णोई समाज काळवीटचा का करतो इतका आदर, सलमान खानने तोडले होते 9 नियम

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;