अतिआत्मविश्वासात राहू नका, राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना

अतिआत्मविश्वासात राहू नका, राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना

हरयाणात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी नेत्यांना अतिआत्मविश्वास टाळावा, अशी सूचना दिला आहे. ते म्हणाले एकजुटीने काम करा आणि अति आत्मविश्वास बाळगू नका, असे राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्राबरोबरच झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये चांगला निकाल मिळतील, अशी आशा होती. विशेष करून हरयाणात पक्ष स्वबळावर सत्तेवर येईल असा विश्वास होता. मात्र निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने काँग्रेसला धक्का बसला. त्यामुळे महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीत काँग्रेस सावध झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. तेव्हापासून महाराष्ट्रात INDIA Alliance अर्थात महाविकास आघाडीत उत्साहात आहे. मात्र, हरयाणाच्या निकालानंतर राहुल गांधींनी सर्वांना सावध केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;