विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार, आज तारीख जाहीर होणार; निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार, आज तारीख जाहीर होणार; निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288, तर झारखंडमध्ये 81 जागा आहेत. ‘एएनआय’ने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार असून यात निवडणुकीची घोषणा केली जाईल. त्यामुळे सर्वांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत.

जम्मू-कश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या वरचेवर सुरू असलेल्या बैठका आणि मतदारांना आकर्षित करणाऱ्या निर्णयांचा सरकारचा धडाका पाहता कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता होती.

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुरू असलेली धावळ लक्षात घेता आज निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी चर्चा होती. ही चर्चा खरी ठरली असून आज दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.

दरम्यान, राजकीय पक्षांकडून जागावाटप, उमेदवार निश्चिती यासाठी बैठका सुरू आहेत. निवडणुकीच्या घोषणेची वेळ जसजशी जवळ येत आहे तशा राजकीय पक्षांच्या बैठकांचा जोर वाढला आहे. काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी राज्यातील नेते दिल्लीत पोहोचले आहेत. भाजपच्या नेत्यांच्याही दिल्लीत जोरबैठका सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;