लग्नाच्या काही महिन्यांतच अभिनेत्रीला पश्चात्ताप; म्हणाली “दररोज रात्री मी रडत..”

लग्नाच्या काही महिन्यांतच अभिनेत्रीला पश्चात्ताप; म्हणाली “दररोज रात्री मी रडत..”

‘इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. 2 मार्च 2024 रोजी तिने बॉयफ्रेंड करण शर्माशी लग्न केलं. सुरभी आणि करण हे लग्नापूर्वी जवळपास 13 वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुरभी तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘कपल ऑप थिंग्स’ या पॉडकास्टमध्ये सुरभीला तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की 13 वर्षे करणसोबत रिलेशनशिपमध्ये राहूनही लग्नानंतरचे अनेक रात्र तिने रडत काढले आहेत. आता कुठे तिचं तिचं वैवाहिक आयुष्य नॉर्मल झाल्याचं तिने सांगितलं आहे.

या मुलाखतीत सुरभी म्हणाली, “जेव्हा करणसोबत माझं लग्न केलं, तेव्हा सुरुवातीला दोन महिन्यांपर्यंत मी दररोज रात्री रडत बसायची. मी सतत रडत असे किती रात्र घालवले मलाच माहीत नाही. आम्ही दोघांनी 13 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. आमच्या लव्ह-लाइफमध्ये बरेच चढउतार आले होते. पण जेव्हा आम्ही लग्न केलं आणि 24 तास एकमेकांसोबत राहू लागलो, तेव्हा आम्हाला समजलं की डेटिंग आणि वैवाहिक आयुष्य खूप वेगळं असतं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Surbhi Chandna (@officialsurbhic)

“मी काहीच मॅनेज करू शकत नव्हती. माहेरी तर सर्वकाही आईवडील सांभाळून घ्यायचे. माझ्यावर फारशी कसली जबाबदारी नव्हती. पण लग्नानंतर सर्वकाही मी एकटी कसं सांभाळेन, हे मला माहीत नव्हतं. दररोज रात्री मी यामुळे रडत बसायची. कारण मला आईवडिलांशिवाय राहण्याची सवय नव्हती. मला माहेरच्या लोकांची खूप आठवण यायची. अशा परिस्थितीत करणने मला खूप सांभाळलं होतं. मी रडायला लागेल की तो मला समजवायचा आणि मला आईवडिलांशी भेटायला घेऊन जायचा. आता कुठे सर्वकाही ठीक झालंय. आता मी सर्वकाही सांभाळून घेते. पण सुरुवातीला मला असं वाटत होतं की मी लग्नच का केलं”, अशा शब्दांत सुरभी व्यक्त झाली.

सुरभीने ‘इश्कबाज’, ‘नागिन 5’ या मालिकांमध्ये काम केलंय. 2009 मध्ये तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत स्विटीची भूमिका साकारत अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘कुबूल है’ या मालिकेत तिला पहिली मुख्य भूमिका मिळाली होती. ‘संजीवनी’ आणि ‘शेरदिल शेरगील’ या मालिकांमध्येही तिने काम केलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;