तामीळनाडूत तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या तीन तास घिरटय़ा

तामीळनाडूत तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या तीन तास घिरटय़ा

एअर इंडिया विमान कंपनीचे तिरुचलापल्लीहून शारजाला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे तब्बल तीन तास हवेतच घिरटय़ा घालत होते, अशी माहिती समोर आली आहे. आज सायंकाळी पावणेसहा वाजता उड्डाण घेताच विमानाची हायड्रोलिक यंत्रणा फेल झाली. त्यानंतर तब्बल तीन तासांनी विमान सव्वाआठच्या सुमारास सुरक्षित लँड करण्यात आले. त्यानंतर विमानातील 141 प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कळल्यानंतर विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला. हायड्रोलिक यंत्रणा फेल झाल्यामुळे विमानातील इंधन आणखी कमी करण्यासाठी वैमानिकाने तीन तास आकाशात घिरटय़ा घातल्याचे सांगण्यात आले. हाय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर विमानतळावर 20 हून अधिक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;