चेंडूला थुंकी लावली तर BCCI करणार कारवाई, क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये हे नियम पाळणे सर्व संघांना बंधनकारक असणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूंवर कारवाई करण्यात येणार आहे.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने नवीन नियम जाहीर केले आहेत. जसे की एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे सामन्यातून मैदान सोडावे लागले, तर संबंधित खेळाडूला पुन्हा त्या सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. त्याला थेट बाद ठरवण्यात येईल. त्याचबरोबर एखाद्या खेळाडूने चेंडूला थुंकी लावली तर त्या खेळाडूवर कारवाई करण्यात येईल आणि चेंडूही बदलण्यात येईल. या नियमांव्यतिरिक्त जेव्हा एखादा फलंदाज धाव घेऊन थांबतो तेव्हा कधी कधी ओव्हरथ्रोमुळे चौकार मिळतो. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा धाव घेण्यापूर्वी तो फक्त चौकार मानला जाईल. म्हणजे फक्त चार धावा संघाला मिळतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List