आंतरराष्ट्रीय अहवालात हिंदुस्थानी अन्न-पदार्थांचे कौतुक, अमेरिका, ऑस्ट्रेलियातील अन्नाचे खराब रँकिंग!

आंतरराष्ट्रीय अहवालात हिंदुस्थानी अन्न-पदार्थांचे कौतुक, अमेरिका, ऑस्ट्रेलियातील अन्नाचे खराब रँकिंग!

हिंदुस्थानात खाल्ले जाणारे अन्न हे G20 मधील इतर देशांच्या तुलनेत अधिक चांगले असल्याचे अलिकडे एका अहवालातून समोर आले आहे. त्याचबरोबर अमेरिका, अर्जेंटीना आणि ऑस्ट्रेलियामधील अन्नाला खराब रॅंकिंग देण्यात आले आहे.

हिंदुस्थानच्या अन्न वापराचा नमुना जगातील सर्व G20 देशांमध्ये सर्वात टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल आहे. त्याच वेळी G20 अर्थव्यवस्थांमध्ये इंडोनेशिया आणि चीन दुसऱ्या स्थानावर आहेत, ज्यांचा डायट पॅटर्न पर्यावरणानुसार आहे. लिव्हिंग प्लॅनेटच्या ताज्या अहवालात संशोधनातून समोर आले.

अमेरिका, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या डायट पॅटर्नला सर्वात वाईट रॅंकिंग देण्यात आले आहे. या देशांमध्ये चरबीयुक्त आणि साखरयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. या देशांतील सुमारे 25 दशलक्ष लोकांचे वजन जास्त असल्याचा इशारा अहवालात देण्यात आला आहे. त्याच वेळी 890 दशलक्ष लोक लठ्ठपणाचे बळी आहेत.

हिंदुस्थानात बाजरीबाबत ज्या प्रकारे लोकांना जागरूक केले जाते, त्याचाही उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. हिंदुस्थानात बाजरी फार पूर्वीपासून वापरली जात आहे. बाजरीचे सेवन करण्यासाठी हिंदुस्थानात अनेक मोहिमाही चालवल्या जात आहेत. ज्यात लोकांना त्याचे फायदे सांगितले जात आहेत. हिंदुस्थानातील बाजरीचा वापर वाढवण्यासाठी अनेक अभियान आखण्यात आले आहेत. आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच हवामानासाठीही चांगली आहे.

हिंदुस्थानातील खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाल्यास येथे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे मिश्रण उपलब्ध आहे. हिंदुस्थानात उत्तरेला डाळी आणि गव्हाचे ब्रेड तसेच मांस अधिक खाल्ले जाते. दक्षिणेत तांदूळ आणि त्याच्याशी संबंधित आंबवलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. जसे इडली, डोसा आणि सांबार इत्यादी. याशिवाय येथील अनेक लोक मासे आणि मांसाचे सेवन करतात. हिंदुस्थानाच्या पश्चिम, पूर्व आणि ईशान्य प्रदेशात हंगामी उपलब्ध मासे हे भाताबरोबरच मुख्य अन्न म्हणून खाल्ले जातात.

या अहवालात असे म्हटले आहे की 2050 पर्यंत जगातील सर्व देशांनी हिंदुस्थानप्रमाणेच आहार पद्धतीचा अवलंब केला तर हवामान बदलात वाढ होणार नाही. जैवविविधतेचे नुकसान होणार नाही. अहवालात प्रामुख्याने स्थानिक आणि हंगामी खाद्यपदार्थ सेवन करण्याच्या गरजेवर भर देण्यात आला आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ कमीत कमी प्रमाणात खावेत, शाकाहारी आहार घ्यावा आणि अन्नाची नासाडी कमीत कमी करावी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;