मुंबईत अत्यवस्थ रुग्णाच्या इच्छेनुसार होणार उपचार
आजाराने ग्रस्त असताना उपचारांची दिशा काय असावी, जीवन संरक्षक प्रणाली सुरू ठेवावी किंवा ठेवू नये यासाठी अत्यवस्थ असलेल्या रुग्णाने तिच्या जिवंतपणी लेखी स्वरूपात दिलेल्या भविष्यकालीन वैद्यकीय निर्देशांचे थोडक्यात इच्छापत्राचे पालन व्हावे, या उद्देशाने पालिकेने 24 विभागात त्या त्या विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. हे आरोग्य अधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उपचारांबाबत कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे त्या अत्यवस्थ रुग्णाच्या इच्छेनुसार त्यांना पुढील उपचार मिळणे शक्य होणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List