हरयाणा निकालावरून राहुल गांधी यांनी उपस्थित केले प्रश्न; आयोगाकडे तक्रार करणार असल्याची दिली माहिती

हरयाणा निकालावरून राहुल गांधी यांनी उपस्थित केले प्रश्न; आयोगाकडे तक्रार करणार असल्याची दिली माहिती

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले. त्यावर आता काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी हरयाणा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले विधानसभा क्षेत्रातून अनेक तक्रारी आल्या आहेत. निवडणूक आयोगाला आता याची जाणीव करून देण्यात येणार असल्याचा संताप राहुल गांधी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर व्यक्त केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही हरयाणाच्या अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. अनेक विधानसभा क्षेत्रांमधून तक्रारी येत असून निवडणूक आयोगाला त्याबाबत कळवणार आहोत. सर्व हरयाणातील नागरिकांनी दिलेला पाठिंबा आणि आमच्या धाडसी कार्यकर्त्यांना त्यांच्या अथक परिश्रमासाठी मनापासून धन्यवाद. हक्क, सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा, सत्याचा हा संघर्ष सुरूच राहील. तुमचा आवाज बुलंद करत राहू, असा निर्धार राहुल गांधी यांनी यावेळी केला.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर लिहिले की, जम्मू कश्मीरच्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद. प्रदेशात इंडिया आघाडीचा विजय हा संविधानाचा विजय आहे. लोकशाही स्वाभिमानाचा विजय आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही हरयाणा निवडणुकीच्या निकालावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी त्याला व्यवस्थेचा विजय असे सांगितले होते. माध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, हरयाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही कारण हा लोकशाहीचा पराभव आहे आणि व्यवस्थेचा विजय आहे. तर पवन खेडा यांनी ईव्हिएमच्या बॅटरीपर्यंत प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, हिसार, महेंद्रगड आणि पानीपत जिल्ह्यांमधून सातत्याने तक्रारी येत आहेत की, तिथे ईव्हिएमची बॅटरी 99 टक्के होती. या जागेंवर काँग्रेसचा पराभव झाला. तर ज्या मशिनींसोबत छेडछाड केलेली नाही आणि ज्याची बॅटरी 60 ते 70 टक्के होती, तिथे आमचा विजय झाला आहे, या सर्व तक्रारी घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;