Ratnagiri News – शिवसैनिकांचा महावितरणच्या अधीक्षकांना घेराव, कर्मचाऱ्याच्या मृत्यूला ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप

Ratnagiri News – शिवसैनिकांचा महावितरणच्या अधीक्षकांना घेराव, कर्मचाऱ्याच्या मृत्यूला ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप

महावितरणच्या पोलवर काम करत असताना वीजेचा धक्का लागून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तरुणाचा मृत्यू हा ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा बळी आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घातला. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच तरुणाचा मृत्यू झाला असून त्या तरुणाच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी. तसेच ठेकेदार आणि महावितरणवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

रत्नागिरी शहरातील निवखोल येथील महावितरणच्या पोलवर तुटलेली वायर जोडत असताना वीजेचा धक्का लागून कुंदन दिनेश शिंदे या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आज रत्नागिरीतील वातावरण तापले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत त्यांना धारेवर धरले. तसेच त्यांना जाब विचारण्यात आला. “ठेकेदार कर्मचाऱ्यांना कुठलेही सुरक्षेचे साहित्य पुरवत नाही. एक हॅण्डग्लोज दहाजणांना वापरायला दिला जातो. कुठलीही सुरक्षा पुरवली जात नसल्यामुळेच या तरुणाचा बळी गेला,” असा आरोप शिवसैनिकांनी केला. तसेच यांनी मृत तरुणाच्या नातेवाईकांना ठेकेदार कंपनीने 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि त्याच्या नातेवाईकांना नोकरीत समाविष्ट करुन घ्यावे, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

यावेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संतप्त शिवसैनिकांसमोर फे-फे उडाली. कामगार कल्याण अधिकाऱ्यांना मृत पावलेल्या तरुणाचे नावही सांगता आले नाही. त्याने चुकीचे नाव सांगितले. यावरुन शिवसैनिक अधिकच संतापले. यावरून महावितरणचा गलथान कारभार पुढे आला. तरुणाच्या मृत्यूला ठेकेदार आणि महावितरण जबाबदार आहे. त्यामुळे महावितरण आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शहर पोलीस निरिक्षक महेश तोरसकर यांनी सर्व अहवालानंतर योग्य ती कारवाई आणि गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मृत तरुणाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याबाबत लिहून घेण्यात आले. तसेच महावितरणनेही कारवाई करण्याबाबत लेखी पत्र दिले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने आणि जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;