‘चल गौरी.. बुरखा घाल, नमाज पठण कर’; शाहरुखचं बोलणं ऐकून सर्वांनाच बसला होता आश्चर्याचा धक्का!

‘चल गौरी.. बुरखा घाल, नमाज पठण कर’; शाहरुखचं बोलणं ऐकून सर्वांनाच बसला होता आश्चर्याचा धक्का!

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान आणि गौरी खान यांनी जवळपास 33 वर्षांपूर्वी लग्न केलं. हे आंतरधर्मीय लग्न असलं तरी दोघं एकमेकांच्या धर्माचा आदर करतात आणि सण-उत्सव एकत्र साजरे करताना दिसतात. गौरी आणि शाहरुखचं आंतरधर्मीय लग्न हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. गौरीने इस्लाम धर्माच्या शाहरुखशी लग्न केलं असलं तरी लग्नानंतर तिने धर्मांतर केलं नाही. ऑक्टोबर 1991 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. सुरुवातीला गौरीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. “माझ्या कुटुंबीयांशी ओळख करून देताना मी शाहरुखचं नाव अभिनव असं सांगितलं होतं. जेणेकरून तो हिंदू आहे असं त्यांना वाटेल. पण ते खूपच बालिश आणि मूर्खपणाचं होतं”, असं गौरी एका मुलाखतीत म्हणाली होती.

लग्नाच्या वेळी गौरीच्या कुटुंबीयांना तिची फार काळजी वाटत होती. लग्नानंतर शाहरुख तिला धर्मांतर करण्यास भाग पाडेल, असं त्यांना वाटत होतं. फरिदा जलाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने हा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला, “मला आठवतंय की गौरीचे पारंपरिक विचारांचे कुटुंबीय घरात बसले होते. ते एकमेकांशी कुजबुज करत होते की मुलगा मुस्लीम आहे. तो तिचं नाव बदलणार का? लग्नानंतर ती पण मुस्लीम होईल का? या सर्व चर्चा ऐकून मी मस्करीत म्हटलं, चल गौरी.. तुझा बुरखा घाल आणि नमाज पठण करायला बस. त्यावेळी संपूर्ण कुटुंब आम्हा दोघांकडे बघत होतं. मी गौरीचं धर्मांतर आधीच केलं की काय, असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे झळकत होता. मी अजून त्यांची मस्करी केली. त्यांना म्हटलं, यापुढे ती नेहमी बुरखा घालणार आहे तिचं नाव आयेशा असं असेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या सिझनमध्ये गौरी धर्मांतर न करण्याच्या तिच्या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “आमच्यात संतुलन आहे. मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते पण याचा अर्थ असा नाही की मी धर्मांतर करेन. माझा असा विश्वास आहे की प्रत्येकाने त्याच्या धर्माचं पालन करावं आणि इतरांच्या धर्माविषयी मनात आदर असावा. शाहरुख कधीच माझ्या धर्माचा अपमान करणार नाही”, असं ती म्हणाली होती. याचंच उदाहरण तिने ‘लेडीज फर्स्ट’ या मुलाखतीत दिलं होतं. “दिवाळीला मी पुजेला सुरुवात करते आणि सर्व कुटुंबीय माझ्यानुसार पूजा करतात. ईदला शाहरुख पुढाकार घेतो आणि आम्ही सर्वजण त्याला फॉलो करतो. हे सर्व खूप सुंदर आहे आणि आमचं मुलंसुद्धा दोन्ही परंपरेचं पालन करतात. त्यांच्यासाठी दिवाळी आणि ईद दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत”, असं गौरीने सांगितलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;