तिसरं लग्न कधी? युजरच्या प्रश्नावर अरबाज खानचं भन्नाट उत्तर

तिसरं लग्न कधी? युजरच्या प्रश्नावर अरबाज खानचं भन्नाट उत्तर

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. गेल्या वर्षी त्याने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं होतं. वयातील अंतरामुळे ही जोडी अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. आता अरबाजने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ (AMA) सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरने अरबाजला थेट त्याच्या तिसऱ्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. त्यावर अरबाजनेही मजेशीर प्रतिक्रिया दिली. अरबाज खानने 1997 मध्ये अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. तर 2017 मध्ये हे दोघं विभक्त झाले. या दोघांना अरहान हा मुलगा आहे.

‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमध्ये एका युजरने अरबाजसमोर त्याचा भाऊ सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मला तुमच्या मोठ्या भावाची बायको व्हायचंय. यावर तुम्ही काय म्हणाल’, असा प्रश्न एका युजरने अरबाजला विचारला होता. त्यावर अरबाजने उत्तर दिलं, ‘मी काय म्हणू? लगे रहो मुन्नाभाई.’ यासोबतच त्याने हसण्याचा इमोजी पोस्ट केला. आणखी एका युजरने अरबाजच्या तिसऱ्या लग्नाविषयी विचारलं. ‘पुढील लग्न’, असा प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर देताना अरबाजने लिहिलं, ‘बस हो गया भाई’ (पुरे झालं आता भावा) यासोबत तो हसण्याचा आणि हात जोडल्याचा इमोजी पोस्ट करतो.

आणखी एका युजरने अरबाजला त्याच्या पत्नीच्या स्वयंपाकाबद्दलही प्रश्न विचारला. ‘शुरा सर्वांत चांगली कोणती गोष्ट बनवते’, असा सवाल संबंधित युजरने केला होता. त्यावर अरबाज हसण्याचा इमोजी पोस्ट करत लिहितो, ‘कथा..’ नंतर तो म्हणतो, ‘मी फक्त मस्करी करतोय. ती मटण बिर्याणी खूप चांगलं बनवते.’ या प्रश्नोत्तरांदरम्यान अरबाजने त्याच्या आवडत्या व्यक्तीचंही नाव सांगितलं. यावेळी त्याने त्याचे वडील सलिम खान यांचं नाव घेतलं.

‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर अरबाज आणि शुराची भेट झाली होती. शुराशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना अरबाज एका मुलाखतीत म्हणाला होता, “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही फार एकमेकांशी बोललो नाही. पण शूटिंग संपल्यानंतरच्या पार्टीत आम्ही एकमेकांशी बोलले. त्यानंतर हळूहळू संपर्क वाढला. आमच्यात बरंच काही साम्य आहे. एकमेकांशी भेटून, बोलून आमच्यात प्रेमाची भावना निर्माण झाली. आम्ही दोघं आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर होतो, जिथे आम्हाला पार्टनरसोबत स्थिर व्हायचं होतं. एकमेकांमध्ये अनेक भावना गुंतल्याने अखेर आम्ही पुढील आयुष्य सोबत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;