महायुती तीनअंकी आकडाही गाठणार नाही! पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

महायुती तीनअंकी आकडाही गाठणार नाही! पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. 65 टक्के जागा आम्ही जिंकलो. या गोष्टीचा विचार केला असता विधानसभेत आम्ही 183 जागा जिंकत आहोत. खरे तर आम्ही त्यापेक्षाही जास्त जागा जिंकणार आहोत. मात्र, महायुती विधानसभा निवडणुकीत तीन अंकी आकडा गाठते की नाही, अशी परिस्थिती आहे, असे भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवले.

कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी, पुणे व पिंपरी-चिंचवड रहिवासी यांच्यातर्फे निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहात कौटुंबिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार समिरण वाळवेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. त्यावेळी चव्हाण बोलत होते. महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम उपस्थित होते.

मुलाखतीत चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात बारा बलुतेदार समाज, मराठा समाज, दलित समाज खेळीमेळीत राहत असे. त्यांच्यात कधीही तेढ निर्माण होत नव्हता. मात्र, आता तसे वातावरण राहिले नाही. काही राजकीय पक्ष या समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. दलित समाजात बौद्ध दलित आणि हिंदू दलित अशी विभागणी करून त्यांच्यातही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकंदरीतच निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडविण्याचे काम सुरू आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

राजकारणाची दिशा मतदार बदलतील! बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन

आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, “मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे काम मी मुख्यमंत्री असताना झाले. मात्र, नवीन सरकारला हे आरक्षण टिकविता आले नाही. सध्या राज्यात बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न आहे. लोकांच्या हाताला कामच नाही. गेल्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग, आयटी कंपनी राज्यात आली नाही. जे उद्योग येत होते, ते गुजरातला पळविले गेले. महाराष्ट्रातील वातावरण उद्योगस्नेही नाही, अशी परस्थिती निर्माण करण्यात आली आहे. बेरोजगारीमुळेच आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिंध्यांना महाडमध्ये चवदार तळ्याचे पाणी पाजणार! सुषमा अंधारे यांचा इशारा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;