रेल्वेची सुधारणा नाही, तर उद्ध्वस्त करण्याचा डाव, भरती प्रक्रियेवरुन जयराम रमेश यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

रेल्वेची सुधारणा नाही, तर उद्ध्वस्त करण्याचा डाव, भरती प्रक्रियेवरुन जयराम रमेश यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) नागरी सेवा परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे अधिकाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश य़ांनी हे रेल्वे सुधारण्याचे प्रकरण नसून खऱ्या अर्थाने रेल्वेला बरबाद करण्याचे प्रकरण असल्याचे म्हंटले आहे.

कांग्रेसचे सरचिटणील जयराम रमेश यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यापोस्टद्वारे जयराम रमेश यांनी केंद्रातील मोदी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. पाच वर्षांपूर्वी, नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या सरकारने आठ रेल्वे सेवा या भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS) मध्ये विलीन केल्या आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे होणारी भरती बंद केली. यानंतर 5 ऑक्टोबर 2024 रोजी, सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि आता एक नागरी सेवांसाठी आणि एक अभियांत्रिकी सेवांसाठी अशी दोन स्वतंत्र परीक्षांद्वारे भरती करणे सुरू ठेवली. हा निर्णय या चिंतेच्या विचाराने घेतला गेला. असे काही आरोप त्यांनी मोदी सरकारवर केले.

“नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांची विचार न करता निर्णय घेण्याची ही सवय आमच्या संस्थांसाठी धोकादायक आहे. रेल्वे ही मूलभूतपणे एक अभियांत्रिकी प्रणाली आहे आणि सर्व भरती मानकीकृत करण्याच्या घाईत हे सत्य जाणूनबुजून विसरणे हे मूर्खपणाचे लक्षण होते. असा हल्लाबोल यावेळी जयराम रमेश यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;