मुंबईने 27 वर्षांचा दुष्काळ संपविला! शेष हिंदुस्थानविरुद्ध आघाडीच्या जोरावर इराणी करंडक जिंकला

मुंबईने 27 वर्षांचा दुष्काळ संपविला! शेष हिंदुस्थानविरुद्ध आघाडीच्या जोरावर इराणी करंडक जिंकला

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघाने इराणी करंडकावर आपले नाव कोरून तब्बल 27 वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. रणजी विजेता मुंबईला शेष हिंदुस्थानविरुद्धच्या या लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेतेपद बहाल करण्यात आले. पहिल्या डावात 222 धावांची नाबाद खेळी करणारा सरफराज खान या विजयाचा नायक ठरला.

सरफराज खानच्या नाबाद द्विशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 537 धावांचा डोंगर उभारला होता. अभिमन्यू ईश्वरनच्या 191 धावांच्या खेळीनंतरही शेष हिंदुस्थानला 416 धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईला पहिल्या डावात मिळालेली 121 धावांची आघाडी या जेतेपदासाठी निर्णायक ठरली.

मुंबईने 8 बाद 329 धावांवर दुसरा डाव घोषित केला. या डावात तनुष कोटियानने (नाबाद 114) शतकी खेळी केली, तर पृथ्वी शॉ (76) व मोहित अवस्थी (नाबाद 51) यांनी अर्धशतके झळकाविली. त्यानंतर उभय संघांच्या कर्णधारांनी सामना अनिर्णित करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईने 1997 नंतर जिंकला इराणी करंडक

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी संघ असलेल्या मुंबईने 1997 नंतर म्हणजेच तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर इराणी करंडक जिंकला. या झळाळत्या करंडकावर मुंबईने 15 व्यांदा आपले नाव कोरले. याआधी, मुंबईने सय्यद मुश्ताक अली चषक अन् नंतर रणजी ट्रॉफीही जिंकलेली आहे. आता इराणी करंडक जिंकण्यातही या संघाला यश मिळाले हे विशेष.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;