नगरचे झाले अहिल्यानगर, केंद्र सरकारकडून जिल्ह्याच्या नामांतराला मंजुरी

नगरचे झाले अहिल्यानगर, केंद्र सरकारकडून जिल्ह्याच्या नामांतराला मंजुरी

नगर जिल्ह्याचे नामांतर आता अहिल्यानगर झाले आहे. केंद्र सरकारने या नामांतराला मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्सवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करावे अशी मागणी होती. तसेच अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशीही मागणी होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर झाल्यानंतर नगरचे नामांतर झाले नव्हते. आता केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे. जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकाचे नाव बदलले जाईल, अशी माहिती दिली होती.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;