महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल देणार पंतप्रधान मोदींना निरोपाचा अखेरचा संकेत, जयराम रमेश यांचा दावा

महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल देणार पंतप्रधान मोदींना निरोपाचा अखेरचा संकेत, जयराम रमेश यांचा दावा

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला संकेत मिळाला होता. आता नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यांना निरोपाचा शेवटचा संकेत मिळेल, असे विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांनी भाजप पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी 4 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला संकेत मिळाला की त्यांची वेळ संपली आहे. आपल्याला जाण्याची तयारी करावी लागेल हे त्यांना कळालं. 8 ऑक्टोबरला (जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल ) त्यांना दुसरा संकेत मिळेल. महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीचे निकाल येतील. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांना तिसरा आणि संकेत मिळेल, असेही जयराम रमेश म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;