14 वर्ष बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या गोविंदाचं करिअर कोणत्या गोष्टीमुळे संपलं?

14 वर्ष बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या गोविंदाचं करिअर कोणत्या गोष्टीमुळे संपलं?

बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा याने त्याच्या अभिनयाच्या प्रवासात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचं नाव आज ही घेतलं जातं. त्याची स्टाईल ही त्याची विशेष जमेची बाजु होती. त्याने केवळ आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर छाप सोडली. त्याची डान्स स्टाईलही इतरांपेक्षा वेगळी आहे. आजही लोकांना गोविंदाची गाणी आणि त्याची डान्स स्टाईल आवडते. हिरो नंबर वन गोविंदाचा जन्म मुंबईत झालाय. तो पंजाबी कुटुंबातून येतो. त्यांच्या वडिलांचे नाव अरुण कुमार आहुजा आणि आईचे नाव निर्मला देवी आहे. त्याने अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई येथे शिक्षण घेतलंय. त्यानंतर त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. गोविंदाने सुनीता आहुजासोबत विवाह केला, त्याला नर्मदा आहुजा आणि यशवर्धन आहुजा ही दोन मुले आहेत.

बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या ‘इलजाम’ या चित्रपटापासून गोविंदाने करिअरची सुरुवात झाली. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 1990 ते 1999 हा काळ गोविंदासाठी खूप चांगला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर यश मिळत गेले. आपल्या करिअरमध्ये गोविंदाने हिरो नंबर वन, कुली नंबर वन, दुल्हे राजा, बडे मियाँ छोटे मियाँ, स्वर्ग, नसीब यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोविंदा शेवटचा 2019 मध्ये रंगीला राजामध्ये दिसला होता.

एकाच वेळी ७० सिनेमे साईन

तेव्हा गोविंदाची इतकी मागणी होती की, त्याने एका वेळेला ७० सिनेमे साईन केले होते. गोविंदा हा असं करणार पहिला स्टार होता. अभिनेत्याकडे इतके काम होते की तो दिवसातून ५-५ शिफ्टमध्ये शूट करत होता. गोविंदाने तब्बल 14 वर्षे बॉलिवूडवर राज्य केले. हिंदी चित्रपटसृष्टीला त्याने अनेक हिट चित्रपट दिले. पण इतके सिनेमे एकत्र साईन केल्याने सेटवर तासनतास उशिरा यायला लागला. एवढेच नाही तर गोविंदाने निर्मात्यांकडून मागणीही सुरू केली होती की, तो या चित्रपटात फक्त मुख्य भूमिका करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

अंधश्रद्धेमुळे करिअर उद्धवस्त

एका जुन्या मुलाखतीत चित्रपट निर्माते पहलाज निहलानी म्हणाले होते, ‘त्याच्यासोबत काम करताना नेहमीच अनिश्चितता होती. त्याने काहीही विचार न करता डझनभर बी-सी ग्रेड चित्रपट साइन केले होते. तो एकाच वेळी 5-6 चित्रपटांवर काम करत होता. नेहमी उशीरा आणि खोटे बोलणे. गोविंदा म्हणायचा की तो हे सर्व पैशासाठी करतोय आणि मी त्याला सांगितले की हा विचार करण्याचा धोकादायक मार्ग आहे. गोविंदा हळूहळू अंधश्रद्धाळू झाला. तो कोणावरही सहज विश्वास ठेवायचा. तो म्हणत असे की सेटवर झुंबर पडणार आहे आणि सर्वांनी दूर राहावे. तेव्हा त्याने कादर खान बुडणार असल्याचा अंदाज वर्तवला. अंधश्रद्धेच्या आधारे तो लोकांना कपडे बदलण्यास सांगत असे. या सर्व गोष्टींमुळे गोविंदाचे करिअर हळूहळू उद्ध्वस्त होत गेले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;