रहिवासी मिंधे सरकारला कोर्टात खेचणार

रहिवासी मिंधे सरकारला कोर्टात खेचणार

पुनर्वसनाच्या नावाखाली धारावीतील बहुतांश रहिवाशांना अपात्र ठरवून त्यांना मिठागराच्या जागेवर स्थलांतरित करण्याचा अदानीचा डाव आहे. मिंधे सरकार आपल्या लाडक्या बिल्डरला मागेल त्या जमिनी देत सुटलेय. पात्र – अपात्र आम्हाला काही माहित नाही. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका असून सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात जाऊ असे रहिवाशांनी म्हटले आहे.

धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी मिठागराच्या जागेवर भाडेतत्त्वावरील घरे योजना राबवण्यास सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. धारावीत सुमारे एक लाख झोपडय़ा आहेत. त्यापैकी तळमजल्यावरील 80 टक्के रहिवाशांना आणि वरच्या मजल्यावरील सर्वच रहिवाशांना अपात्र ठरवून त्यांना मिठागरच्या जागेवर स्थलांतर करून पात्र रहिवाशांसाठी लेबर कॅम्पमधील रेल्वेच्या जमिनीवर घरे बांधून धारावीचा पुनर्विकास झाला असे चित्र उभे करतील. उर्वरित जागा अदानीच्या घशात घालून तिथे बीकेसी 2 सिटी उभारण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप धारावी बचाव आंदोलनचे समन्वयक ऍड. राजेंद्र कोरडे यांनी केला.

भाडेतत्त्वावरील घरांमधूनही कमाई 

अपात्र रहिवाशांसाठी मिठागराच्या जागेवर भाडेतत्त्वावर घरे बांधण्यात येणार आहेत त्यांच्यासाठी हायर परचेसचा पर्याय ठेवला आहे. बांधकामासाठी जेवढा खर्च लागेल त्याच्या 30 टक्के अधिक पैसे रहिवाशांकडून उकळले जाणार आहेत. अशाप्रकारे रहिवाशांना विस्थापित करून धारावीचा हिस्सा  मिळवायचा आणि भाडेतत्वावरील घरांमधून कमाई देखील करायची अशी त्यांची योजना आहे, असेही ऍड. कोरडे म्हणाले.

मिठागरांच्या जमिनीवर बांधकाम नकोच 

पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱया मिठागराच्या जागेवर बांधकाम करण्यास आमचा पूर्वीपासूनच विरोध आहे. त्यातच धारावीतील लोंढय़ामुळे भविष्यात मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीतील नागरी सोयी सुविधांवर प्रचंड ताण येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी येत्या 2 ते 3 दिवसांत आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, असे मुलुंडमधील ऍड. सागर देवरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;