वादळी पावसामुळे भातशेती भुईसपाट

वादळी पावसामुळे भातशेती भुईसपाट

गेल्या तीन दिवसांपासून खालापूर तालुक्यात वादळी पावसाचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाल्याचे पाहून शेतकरी कोलमडून गेला आहे. दररोज ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असल्याने पिकांचा चिखल झाला आहे. कृषी विभाग, महसूल खात्याच्या वतीने नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करावेत. नुकसानीची तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला जात असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतातील भात लोंबी डौलदार दिसत असतानाच गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे भात पीक जमीनदोस्त झाले आहे. शेतात पावसाचे पाणी साचले असल्याने पडलेले भात कुजणार आहे. असाच पाऊस पडत राहिला तर बळीराजाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;