कंगनाची विधानं निरुपयोगी, निराधार आणि अतार्किक…! संतापलेल्या भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली जळजळीत प्रतिक्रिया

कंगनाची विधानं निरुपयोगी, निराधार आणि अतार्किक…! संतापलेल्या भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली जळजळीत प्रतिक्रिया

अभिनेत्री खासदार कंगना रणौतने भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. आता तर भाजपचे प्रवक्तेच कंगनावर जोरदार टीका करत आहे. त्यामुळे पक्षाचं देशासमोर हसं झाल्याची भावना राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी गुरुवारी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितलं की, मंडीच्या खासदार कंगना रणौतचे तीन शेतीविषयक कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी करणारे विधान ‘निराधार आणि अतार्किक’ आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शेरगिल म्हणाले की, कंगनाच्या ‘शीख समुदायाविरुद्ध आणि शेतकऱ्यांविरुद्धच्या सततच्या निरुपयोगी, निराधार आणि अतार्किक विधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कामाचे’ नुकसान केले.

शेरगिल पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पंजाबमधील शेतकऱ्यांशी जो ‘बंध’ तयार केला आहे तो ‘कायम’ असून आणि कंगना रणौतच्या ‘बेजबाबदार विधानांवरून त्याचा न्याय केला जाऊ नये’.

शेतकऱ्यांच्या विरोधानंतर रद्द करण्यात आलेले तीन शेतीविषयक कायदे सरकारने परत आणले पाहिजेत, असं तिने सांगितल्यानंतर मंगळवारी वाद निर्माण झाला होता.

भाजपने तिच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे आणि म्हटले आहे की त्यांना पक्षाच्या वतीने या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी सांगितले की, कंगनाचे शेतीविषयक कायद्यांवरील विधान ‘वैयक्तिक विधान’ आहे.

‘कंगना रणौतला भाजपच्या वतीने असे विधान करण्याचा अधिकार नाही आणि ते शेतीच्या विधेयकांवर भाजपचे मत नाही. आम्ही या विधानाचा निषेध करतो’, असे ते पुढे म्हणाले.

कंगना रणौतने मंगळवारी जाहीर माफी मागितली आणि ती म्हणाली, ‘मी माझे शब्द परत घेते’.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;