Jayakwadi dam alert – जायकवाडी धरण ओव्हरफ्लो; 12 दरवाजे दुसऱ्यांदा उघडले, गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

Jayakwadi dam alert – जायकवाडी धरण ओव्हरफ्लो; 12 दरवाजे दुसऱ्यांदा उघडले, गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

>> बद्रीनाथ खंडागळे

मराठवाड्याची जीवनवाहिनी असणारे जायकवाडी धरण 100 टक्के भरले असून जलाशयामध्ये सध्या 4 हजार 169 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नाथसागर प्रकल्पाचे 27 पैकी 12 दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रामध्ये 6 हजार 788 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

1522 फूट जलक्षमता असलेल्या या धरणात आज 1521.90 फूट पाणीपातळीची नोंद झाली. 99.80 टक्के पाणीसाठा असताना ‘वर’च्या भागातील पावसाचे 4 हजार 169 पाणी नव्याने दाखल होत आहे. त्यामुळे जलसंपदा प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला.

नाथसागर प्रकल्पाचे 10, 11, 12, 14, 16, 18, 19, 21, 23, 25, 26 व 27 क्रमांकाचे 12 दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट वर करून 6 हजार 228 क्युसेक्स पाण्याचा गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या दगडी धरण विभागाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी ही माहिती दिली असून गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणामध्ये 24 ऑगस्ट रोजी केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. नाथसागरची पाणीस्थिती चिंताजनक बनली असताना नाशिक व नगर भागातील पावसाचे पाणी येण्यास सुरुवात झाली. नंतर पाणलोट क्षेत्रात असलेली 9 धरणे तुडुंब भरली. त्यामुळे वरच्या धरणातून जलविसर्ग केला गेला. 8 सप्टेंबर रोजी जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरले. 9 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. 5 दिवसांनंतर ते टप्प्याटप्प्याने बंद करून जलविसर्ग थांबवण्यात आला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काठावरील शेतात बांधलेले पशुधन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;