आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा

आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा

हिंदुस्थानातील 25 कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढले आहे आणि या यशाचा अनुभव आम्ही सर्वांशी शेअर करू शकतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत विविध समस्यांशी झुंजणाऱ्या राष्ट्रांसाठी सहकार्याचा हात पुढे केला.

‘समिट ऑफ फ्युचर’ परिषदेत बोलताना मोदी यांनी युद्ध, दहशतवाद, शांतता, सायबर वॉर, समुद्र आणि अवकाश यासह अनेक मुद्दय़ांकडे जगाचे लक्ष वेधले. मानवतेचे यश रणांगणात नव्हे, तर सामूहिक शक्तीमध्ये आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सुरक्षा परिषदेसाठी केला दावा

सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठीही मोदी यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असून जी 20 शिखर परिषदेने आफ्रिकन युनियनला दिलेल्या कायमस्वरूपी सदस्यत्वाकडे त्यांनी महासभेचे लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;