लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा! आज मुंबईत ‘जनसभा’

लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, महाराष्ट्र वाचवा! आज मुंबईत ‘जनसभा’

निर्धार महाराष्ट्राचा आणि भारत जोडो अभियानच्या वतीने मुंबईत शनिवार, 21 सप्टेंबर रोजी जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 3.30 वाजता ही जनसभा होणार आहे. या जनसभेत जम्मू-कश्मीर, गोवा आणि मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा आणि महाराष्ट्र वाचवा’ या शिर्षकाखाली आयोजित जनसभेत महाराष्ट्र आणि देशातील स्थितीवर मान्यवरांकडून विचारमंथन होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ‘हम भारत के लोग’चे अध्यक्ष तुषार गांधी, सेंट्रल कमिटी संयुक्त किसान मोर्चाचे डॉ. सुनिलम, प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन फ्रंटचे संयोजक श्याम दादा गायकवाड, भारत जोडो अभियानचे राज्य संयोजक उल्का महाजन, पुलवामा टथ मुव्हमेंटचे संयोजक फिरोज मिठीबोरवाला आपली विचार मांडणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;