मुंबई-दिल्ली महामार्ग उंदरांमुळे खचला! मोदींच्या लाडक्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अजब दावा…

मुंबई-दिल्ली महामार्ग उंदरांमुळे खचला! मोदींच्या लाडक्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्याचा अजब दावा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला मुंबई-दिल्ली महामार्ग खचला असून अनेक वाहनांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून टीका होत असताना हा महामार्ग बांधणाऱया मोदींच्या लाडक्या कंत्राटदाराच्या कंपनीतील कर्मचाऱयाने उंदरांमुळे हा रस्ता खचल्याचे अजब विधान केले. त्याच्या या विधानामुळे निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी आता कंपनीने या कर्मचाऱयाची हकालपट्टी केली आहे.

केसीसी बिल्डकॉन या कंपनीच्या कनिष्ठ कर्मचाऱयाने मुंबई-दिल्ली महामार्गाच्या दुरवस्थेला उंदरांना जबाबदार धरले आहे. हकालपट्टी केलेल्या कर्मचाऱयाला महामार्गाच्या बांधणीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते. त्याने केलेली टिप्पणी अतिशय चुकीची होती. त्यामुळे त्याला काढून टाकण्यात आल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. हा कर्मचारी देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थापक नव्हता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी या महामार्गाच्या दुसऱया टप्प्याचे अनावरण कले होते. या दुसऱया टप्प्यात राजस्थानातील 373 किमी, मध्य प्रदेशातील 244 किमी आणि हरयाणातील 79 किमी टप्प्याचे अनावरण झाले होते. तर सोहना-दौसा हा टप्पा आधीपासूनच कार्यरत होता.

मुंबई-दिल्ली महामार्ग 1386 किमीचा असून हिंदुस्थानातील सर्वात मोठा महामार्ग आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या राज्यातून हा महामार्ग जातो.

काय म्हणाला होता कर्मचारी?

उंदीर किंवा छोटय़ा प्राण्याने खड्डा केला असावा. ज्यामुळे पाणी झिरपून मोठा खड्डा पडला असावा, अशी टिप्पणी या कर्मचाऱयाने केली होती. दरम्यान, या प्रकल्पाचे दौसा येथील संचालक बलवीर यादव यांनी सांगितले की, पाणी झिरपल्यामुळे महामार्गावर खड्डा पडला असावा तसेच रस्ताही खचला असावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;