रस्ता बनवण्यासाठी 1900 कोटींचा खर्च, पण टोलवरून 8000 कोटींची वसुली! नितीन गडकरींनी दिले उत्तर

रस्ता बनवण्यासाठी 1900 कोटींचा खर्च, पण टोलवरून 8000 कोटींची वसुली! नितीन गडकरींनी दिले उत्तर

दिल्ली-जयपूर महामार्गाच्या बांधकामासाठी 1900 कोटी रूपये लागले. पण त्यावर 8000 कोटींचा टोल वसूल करण्यात आला. नुकतेच माहितीच्या आधिकाराखाली या महामार्गाबाबत माहिती मिळाली आणि अनेक प्रश्न उपस्थित झाले. यावर आता केंद्रीय रस्ते वाहूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते बनविण्यासाठी खर्च कमी आणि त्यावर वसुली जास्त केल्याचे आरोप केले जातात. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, एखादे घर किंवा कार रोख देऊन खरेदी केल्यास ती आपल्याला अडीच लाखाला पडते. पण तीच गोष्ट कर्जावर घेतली तर त्याची किंमत 5.5 ते 6 लाख रूपये होते. त्यासाठी व्याज भरावे लागले. त्यामुळे अनेकदा रस्त्यांची कामेही कर्ज घेऊन केली जातात.

राजस्थानमधील दिल्ली-जयपूर महामार्गावरील बांधकामासाठी 1900 कोटी रूपये खर्च झाले आणि त्यावर मनोहरपूर टोल प्लाझावर 8000 कोटींची टोल वसुली केली. गडकरी यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, हा रस्ता 2009 साली आघाडी सरकारने मंजूर केला होता. त्यासाठी 9 बॅंकांकडून कर्ज घेतले होते. तो रस्ता तयार करतानाही अनेक अडचणी आल्या. ठेकेदार पळून गेले, काही बॅंकांनी न्यायालयात दावे दाखल केले. नवीन कंत्राटदार आले. त्यानंतर नवीन ठेकेदारांना हटविण्यात आले. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्या निर्णयावर स्थगिती मिळवली. मग या रस्त्याचा नवीन डीपीआर तयार केला गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाले आहे. सहा पदरी रस्ता बनवायचा असेल तर अतिक्रमणे हटवावी लागतील. या सर्व प्रकारामुळे रस्त्याचा खर्च वाढतो आणि टोल वसुलीची मुदत वाढते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;