19 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास

19 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास

मान्सूनच्या निरोपाची वेळ आता जवळ आली आहे. आणखी पाच दिवसांनंतर म्हणजेच 19 सप्टेंबरपासून मान्सून माघारी परतायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदाच्या वर्षी देशावर वरुणराजाने चांगलीच कृपा केली. महाराष्ट्रासह देशभरात चांगला पाऊस झाला. एरव्ही कोरडाठाक होणारा मराठवाडा भिजून चिंब झाला. राज्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली.

देशात सरासरी 772.5 मि.मी. पर्जन्यमान असते. या वर्षी 1 जूनला मान्सून दाखल झाल्यापासून आतापर्यंत 836.7 मि.मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच आठ टक्क्यांनी हे प्रमाण जास्त आहे. धो-धो बरसलेला मान्सून 19 ते 25 सप्टेंबर या कालावधीत परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सर्वसाधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी फिरतो. या वर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;