पोरं तापानं फणफणली; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू, दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पालकांची 15 किमी पायपीट

पोरं तापानं फणफणली; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू, दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पालकांची 15 किमी पायपीट

तापाने फणफणलेल्या मुलांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयापासून गावापर्यंतचा रस्त्याही खराब होता आणि रुग्णवाहिकाही उपलब्ध नसल्याने पालकांनी मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखल तुडवत 15 किलोमीटर पायपीट केली. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात दुर्गम भागात असणाऱ्या पत्तीगाव येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव रमेश वेलादी (वय – 6 वर्ष) आणि दिनेश रमेश वेलादी (वय – साडेतीन वर्ष) अशी मृतांची नावे असून ते अहेरी तालुक्यातील येर्रागड्डा येथील रहिवासी होते. आई-वडिलांसोबत ते आजोळी पत्तीगाव येथे आले होते. तिथेच दोघेही आजारी पडले. आरोग्यकेंद्र दूर असल्याने पालकांनी आधी त्याला एका पुजाऱ्याकडे नेले. पुजाऱ्याने त्यांना जडीबुटी दिली, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावली.

पालकांनी मुलांना घेऊन जिमलगट्टा आरोग्यकेंद्र गाठले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. बाजीराव आणि दिनेश या दोघांचाही दीड तासांच्या अंतराने मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे आरोग्य केंद्रापासून पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, त्यामुळे दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पालकांना 15 किलोमीटर पायपीट करावी लागली. याचा व्हिडीओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर करत सरकारवर हल्ला चढवला आहे.

दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत 15 किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले, असे वडेट्टीवार म्हणाले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;