लोकांकडील पैसा संपतोय, बचत आली थेट…; रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती
देशातील 9 लाख कोटी रुपयांएवढी बचत म्हणून जमा असलेली रक्कम खर्च झाल्याचे धक्कादायक वृत्त काही महिन्यापूर्वी समोर आले होते. त्यानंतर आता आणखी एक वृत्त समोर आले आहे. ज्यानुसार देशातील जनतेकडे बचत व ठेवींच्या स्वरुपात असलेला पैसा हा आता निम्मा होत आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांनी ही माहिती दिली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात पात्रा यांनी याबाबत सांगितले.

”लोकांच्या ठेवींमध्ये कपात झाल्याने कुटुंबांची आर्थिक बचत कमी होत चालली आहे. साधारणत: आता लोकं आर्थिक बचतीपेक्षा घरांसारख्या भौतिक मालमत्तांकडे वळू लागले आहेत. कोरोना काळाच्या बचतीचा जो आकडा होता तो आता जवळपास निम्मा झाल आहे. आता लोकांकडे अर्धीच बचत शिल्लक राहिली असल्याचे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List