राज्यातली कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली, जितेंद्र आव्हाड यांची टीका

राज्यातली कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाली, जितेंद्र आव्हाड यांची टीका

गोमांस घेऊन जाण्याच्या संशयावरून काही तरुणांनी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. पण त्यांना तत्काळ जामीन मंजूर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था धुळीस मिळाला आहे, पोलिसांचा धाकच उरला नाही असे आव्हाड म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयाचे कुठल्याही प्रकारे पालन न करता रेल्वे पोलिसांनी अतिशय सौम्य कलम लावली आणि गुन्हेगारांना मदत करण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा इतका गंभीर असून देखील त्याच्या गांभीर्याकडे आणि त्याच्या उमटलेल्या पडसादाची जाणीव ठेवली नाही असे आव्हाड म्हणाले.

त्या वृद्ध इसमाची दृष्टी कमी झाली. त्याला लघवीला होत नाही त्याच्या खिशातील २ हजार ८०० रुपये लुटले गेले. त्याला खुनाची धमकी देण्यात आली, हे सगळं होत असताना त्याची नोंद न करिता कोणती तरी सौम्य कलमे लावून आता त्या गुंडांचा जामीनही झाला आहे. पोलिसांवर लोकांचा विश्वास कसा राहील आणि यामुळेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळते, कारण पोलिसांचा धाकच उरलेला नाही. असं जर होत असेल तर जनता रस्त्यावर उतरली तर लोकांची चूक काय ? जर रस्त्यावर उतरले तरी तुम्ही गुन्हा नोंदवणार लोकांवर असे आव्हाड म्हणाले.

तसेच आजची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात न घडलेली घटना आहे इतकी विकृत घटना असतानादेखील जर पोलीस त्याचे गांभीर्य ओळखत नसतील तर हे महाराष्ट्राचे दूर्दैव आहे. दिवसें दिवस कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळवण्यास पोलीस कारणीभूत ठरत आहेत. असे म्हणताना 126 (1), 127 (1), 118(1), 309(6), 189 (4), 189(3), 191(1), 191(2),191(3) BNS पोलिसांनी ही कलम लावायला हवी होती असेही आव्हाडांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;