आजपासून राज्यात साक्षरता आठवडा
राज्यात 1 ते 8 सप्टेंबर या काळात ‘उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. यंदा या अभियानासाठी केंद्राकडून ‘जन-जन साक्षर’ व राज्य सरकारकडून ‘साक्षरतेकडून समृद्धीकडे’ हो घोषवाक्ये देण्यात आलेली आहेत. 8 सप्टेबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून ‘साक्षरता सप्ताह’ राबविण्यात येत आहे. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम mobile app वर स्व-नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सदरच्या ‘साक्षरता सप्ताह’ कालावधी मध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने उपक्रम आयोजित करावयाचे आहेत. अशा सूचना शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List