पाकिस्तानशी अखंड संवाद ठेवण्याचा काळ संपला, यापुढे नरमाईची भूमिका नाही; केंद्र सरकारचा इशारा

पाकिस्तानशी अखंड संवाद ठेवण्याचा काळ संपला, यापुढे नरमाईची भूमिका नाही; केंद्र सरकारचा इशारा

पाकिस्तानशी अखंडपणे संवाद सुरु ठेवण्याचा काळ आता संपला असून पाकिस्तानबाबत कोणतीही नरमाईची भूमिका घेतली जाणार नाही, असा इशारा केंद्र सरकारने आज पाकिस्तानला दिला. कोणत्याही पृतीचे परिणाम असतातच. जम्मू-कश्मीरचा मुद्दा असेल, तर आता कलम 370 हटवण्यात आले आहे. त्यामुळे  पाकिस्तानशी कोणत्या प्रकारचे संबंध यापुढे कायम ठेवायचे असा प्रश्न आहे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी हिंदुस्थानची भूमिका मांडली.

त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांमधील घडामोडी आणि हिंदुस्थानातील दहशतवादी कारवाया यासंदर्भात भाष्य केले. पाकिस्तानशी अव्याहतपणे संवाद ठेवण्याचा काळ आता संपला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, पाकिस्ताकडून होणाऱया कोणत्याही प्रकारच्या कारवाईला हिंदुस्थान उत्तर देईल. हिंदुस्थानची पृती आता इतरांवर अवलंबून नसेल.  हिंदुस्थान उत्तर देणार, असे जयशंकर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;