यंदा पावसाचा मुक्काम वाढणार, शेतीवर परिणाम होणार?; काय म्हणाले शास्त्रज्ञ?
यंदाच्या वर्षी वेळेत पावसाचे आगमन झाले. पाऊसही चांगला पडला. मात्र यंदा पाऊस थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरअखेर किंवा त्यानंतरही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ला-निना हवामान प्रणालीमुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनचे प्रस्थान होण्यास विलंब होणार आहे. पावसाचा मुक्काम वाढल्यास शेतीवर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. भात, कापूस, सोयाबीन, मका आणि कडधान्यांची कापणी सप्टेंबरच्या मध्यात होते. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर कापणी करणे कठीण होईल. मात्र हिवाळ्यात पेरलेल्या पिकाला फायदा होईल, अशी हवामान खात्याच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी माहिती दिली. हवामानाची स्थिती अशीच राहिल्यास शेतमालाच्या निर्यातीतही अडचणी निर्माण होतील.
जूनच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण देशात सात टक्के अधिक पाऊस झाला. काही राज्यांमध्ये, सरासरीपेक्षा 66 टक्के अधिक पाऊस पडला. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून आता सप्टेंबरच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पाऊस झाल्यास उन्हाळ्यात लागवड केलेल्या पिकांवर परिणाम होणार आहे. खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List