छत्तीसगढमध्ये चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी छत्तीसगढच्या नारायणपूर व कांकेर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांड जंगलात ही चकमक झाली.
Chhattisgarh | Bodies of three uniformed female naxals along with arms and ammunition recovered from site of anti-naxal operation in Madh; Search operation underway
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 29, 2024
मांड जंगलात काही नक्षलवादी भेटणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पोलीस व सुरक्षा दलाने या भागात शोध मोहीम सुरू केली. या शोधमोहिमे दरम्यान झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List