मध्य रेल्वेवर 15 वर्षांत 29 हजार प्रवाशांचा मृत्यू, हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

मध्य रेल्वेवर 15 वर्षांत 29 हजार प्रवाशांचा मृत्यू, हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

पश्चिम रेल्वेप्रमाणे मध्य रेल्वेवरही अपघाती मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर 15 वर्षांत 29 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशी ऋषन यांनी बुधवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. असुरक्षित लोकल प्रवासाकडे लक्ष वेधत यतीन जाधव यांनी जनहित याचिका केली आहे.

2009 ते जून 2024 दरम्यान रेल्वे रूळ ओलांडणे, खाली पडणे, खांबाला धडकून, प्लॅटफॉर्म व फुटबोर्डच्या पोकळीमध्ये सापडणे आदी अपघातांत 29,321 प्रवाशांचा मृत्यू झाला. 2009 -10 मध्ये 3396, तर 2023-24 मध्ये 2159 अपघात घडले, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. रेल्वेच्या प्रतिज्ञापत्रांची दखल घेत खंडपीठाने याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्यास मुदत देत सुनावणी तहकूब केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;